Friday, 15 February 2019

कसा झाला पुलवामाचा हा भ्याड हल्ला? जाणून घ्या एक एक गोष्ट.

 १४ फेब्रुवारी २०१९, दुपारच्या वेळी तुमच्या माझ्यासारखा एक तरुण सोशल मिडीयावर फेरफटका मारतच असतो. गुंडीबागचा आदिल अहमद दार. आदिलने काही शेर-ओ-शायरी वाचली आणि म्हटलं कि “हमे चमन बचाना है, और इसके लिये कई लोगो कि जान भी जायेगी.” आधी तर वाटलं कि आहे कोणी भुलला-भटकला तरुण पण त्याची गोष्ट कि लक्ष वेधून घेणारी आहे कारण त्याचं आणखी एक नाव आहे, वकास कमांडो. आदिलच त्या गाडीचा ड्रायवर आहे ज्या गाडीने सीआरपीएफ जवानांच्या बस ला धडक दिली आणि गेला काही दशकातला सर्वात मोठा आतंकी हल्ला घडवून आणला.


नमस्कार, मी शुभम दातारकर आजच्या बातम्यांची सुरुवात करतोय एका खूपच वाईट आणि दुखी बातमीपासून. दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर मधील पुलवामा इथे झालेल्या भ्याड हल्ल्यात आता पर्यंतच्या माहितीनुसार ४४ जवानांना वीरगती प्राप्त झाली आणि हा आकडा वाढतच चालला आहे. जवळपास ४८ जवानांची प्रकृती खूपच गंभीर आहे आणि काही जवानांनी उपचारा दरम्यान आपला अखेरचा श्वास घेतला.
२०१६मध्ये झालेल्या उडी हल्ल्यापेक्षाही हा हल्ला मोठा आहे. त्यावेळी १९ जवान शहीद झाले होते आणि यावेळी...
कसा झाला हा हल्ला: काल रस्ता सुरु झाला आणि आज तिथे हल्ला झाला. हा हल्ला श्रीनगर जम्मू हायवे वर झाला आहे. संपूर्ण भारताला आणि जम्मूला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे जी वर्षभर सुरूच असते. जास्त बर्फ पडल्या कारणाने या रस्त्याला आठवडाभर बंद ठेवण्यात आलं होतं. १३ फेब्रुवारीलाच हे नव्याने सुरु करण्यात आले होते. ३ बटालियनच्या ७० गाड्या जवळपास २५०० जवानांना घेऊन त्या सर्यावरून जात होत्या जेव्हा एक वेगवान गाडी येऊन सीआरपीएफच्या बसला धडकली. आदिल हीच गाडी चालवत होता.



मोठा स्फोट झाल्या कारणाने बाकी गाड्या सुद्धा त्याने प्रभावित झाल्या. अशीही बातमी आहे कि काही जवानांनी त्यातून वाचण्याचा प्रयत्न केला पण लपून बसलेल्या आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि तेथून पळून गेले. ५० पेक्षा जास्त जवानांना गोळ्या लागल्याची बातमी आहे. हा एक आत्मघाती हल्ला होता. गाडी आदिल चालवत होता जो मागच्या वर्षीच जैश-ए-मोहम्मद मध्ये सामील झाला होता. यात तोही मेला. हा हल्ला झाला अवन्तिपुरा मध्ये. नेमका त्याच जागी का झाला त्यामागेही कारण आहे.

जवळपास ३ महिन्या आधी, २९ नोव्हेंबर २०१८ला अवंतीपुराच्या इलाक्यात सैन्याने एका एनकाउंटर मध्ये अदनान अहमद लोन आणि आदिल बिलाल भट्ट ला कंठस्नान घातले होते. हे दोघेही हिजबुल मुजाहिद्दीनचे कमांडर होते. हा आदिल तोच होता ज्याने अवंतीपुऱ्यातच हेड कॉन्स्टेबल आशीर हुसैनची हत्या केली होती आणि अदनान हिजबुल वित्त विभागाचा कर्ताधर्ता होता. दोघेही एरिया कमांडर होते. २ दिवसांपूर्वी याच इलाक्यात गोरीपुराजवळ एका चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आलं होतं आणि एक जवान शहीद झाला होता. दक्षिण काश्मीरचा हा पूर्ण इलाका उग्रवाद ग्रासित आहे आणि म्हणूनच आतंकवाद्यांनी याच जागी हल्ला केला.

या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अनिर्बंध कार्यकर्त्यांची भावपूर्ण श्रद्धांजली.