प्रिय निलीमा,
तसं पाहिलं तर नाहीच आहे मला अधिकार तुला प्रिय
म्हणण्याचा... पण तरीही म्हटलं; काही सांगता येत नाही ना, हे पत्र पूर्ण वाचून झाल्यानंतर पुन्हा कधी बोललीच नाहीस तर... पुन्हा कुणाला
प्रिय म्हणायचं.
आजकालच्या युगात कुणी पत्र लिहिते का, ते पण माहिती नाही मला... पण मला वाटलं की माझ्या भावना शब्दांत मांडल्या तर
थोड्या जास्त चांगल्याने सांगत येईल की किती प्रेम आहे तुझ्यावर.
या पूर्वी कधी असं पत्र वैगेरे द्यायचा प्रसंग आला
नाही; आवड आहे लिहिण्याची; म्हणून लिहिलं खुपदा आहे; पण कदाचित हिंमतच झाली नाही द्यायची किंवा मला अस वाटतंय की हीच योग्य वेळ आहे, तुला सांगण्याची.
गेल्या १० वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो; मैत्री नेमकी कधीपासून आहे ते काही पक्का-पक्का माहिती नाही.. आपल्यात चांगली मैत्री आहे, मला वाटते तू कदाचित मला समजून घेशील; माहिती आहे मला की माझा स्वभाव थोडासा पोरकट आहे
म्हणून माझ्या गोष्टींना तू गंभीरतेने घेणार नाहीस कदाचित; पण काय करणार... त्या दिवशी तुला इतक्या वर्षानंतर
इतक्या जवळून बघितल... तुझा तोच जुना चेहरा, तोच जुना स्पर्श आणि तेच जुनं हसणं अगदी नव्याने
माझ्या आयुष्यात पुन्हा घर करून गेलं...
“मै तुम्हारे लिये जान भी दे सकता हुं” असल्या १९७० च्या फिल्मी डायलॉग तुला पटवण्याच्या
वैगेरे काही विचार नाही आहे, आणि मला याची पण कल्पना आहे की कदाचित तुला नसेल आवडत
मी; तसाही... आहे पण नाही म्हणा माझ्यात काही
आवडण्यालायक... पण मला तू आवडतेस... फार आवडतेस. अगदी माझ्या laptopपेक्षा जास्त... आणि मला आनंद होईल आयुष्यभर
तुझ्यासोबतीने संसार करायला... माझ्याशी लग्न करशील का?
कमिटमेंट वैगेरे मागत
नाहीये मी, विचारतोय फक्त, तुला आवडेल का ? तू अजूनही शिकतेय ना ? मी काम-धंदा करत नाही ना ? अरे तर आरामत करूया ना.. घाई नाही मला कश्याचीच...
तुला वाटेल तेव्हा करूया. तुला हे सगळं वाचून कदाचित विचित्र वाटेल; गमतीशीर पण वाटेल... हसून घे. जोरात हस वाटल्यास. पण
भावना तेवढ्या समझुन घे.
माहिती आहे मला, आपला वय सारखं आहे आणि असं पण होऊ शकते की तुझ्या
लग्नाची बोलणी येत्या २-४ वर्षात सुरु होईल... कठीण आहे म्हणा सिद्ध करणं की किती
प्रेम आहे माझं तुझ्यावर पण तुझी साथ असली ना, तर मी ते पण करून घेईल. मी शब्द
देतो. तुला कधीही एकटं सोडणार नाही. माझं वचन राहिलं तुला मी कुठेही कमी पडणार
नाही... पण त्यासाठी हवाय तुझा जन्मभरासाठी साथ देणारा निर्धार. तो असेल तर तू
माझा स्वीकार कर. अन्यथा मला फसविल्याचं पाप तुझ्या माथी लागलं असतं. मला काहीच
घाई नाही. तू म्हणशील तो पर्यंत वाट बघण्याची तयारी आहे माझी. मला हवंय ते केवळ
तुझं आश्वासक उत्तर. नीट विचार कर. माझ्यासाठी.
आज तरी माझं मन म्हणतच
होतं, अरे तिचे पण काही स्वप्न असतील, तिच्या आई-बाबाचे असतील.. अस कसं ती तुला हो म्हणून
देईल ? जिथंपर्यंत मला माहिती आहे निलीमा तरी त्या मुलींमधली
आहे जी आपल्या घरच्यांच्या स्वप्नांचा विचार करूनच कुणालातरी आयुष्यभर साथ
देण्याची; आणि तू दिलेला शब्द पाळू नाही शकलास
तर?
प्रेमात रममाण
होण्याची तुझ्यात उर्मी जागविली खरी, पण चाकोरीच्या बाहेर
विचार करणे खरंच अवघड आहे.
पण मग दुसरं मन; ते पण बोलायला लागलंच कि... “अरे होऊ शकते कदाचित त्या मुलीची तुझ्यावर सर्वस्व ओवाळून टाकण्याची
तयारी असेल, कदाचित तिला तुझ्याकडून आयुष्य भराची साथ हवी
असेल, जर टाईमपास करायचा असता तर केव्हाचीच “हो” म्हणून मोकळी झाली असती. पण तसं नाही,
एवढी समजूतदार मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही. या मुलीने तुला
वास्तव दर्शन घडवलं... म्हणून हे पत्र लिहिण्याचं साहस
करतोय... (त्या दिवशीचं बोलणं आपल्यातच राहू दे)
हे बघ निलीमा; तुझा नकार असेल तर तो मी आनंदाने पचवून घेयील , पण तुझा अबोला, तो नाही माझ्याच्यानं सहन होणार ....
आपण निवांत बोलूया यावर; जर तुला बोलावसं वाटलं...
वाट पाहतोय तुझ्या उत्तराची..
कधी
नव्हतोच तो तुझाच - शुभम
- शुभम दातारकर
No comments:
Post a Comment