Tuesday, 3 January 2017

आठवणी..

भूतकाळातील आठवणींचे काही फुलं
वर्तमानात काहीतरी बहरून येतात,
मग अलगदच पाकळी रूपाने
एक एक क्षण आपल्या आठवणी देऊन जातात

दिशा बदलावणारे वारे, आणि
दशा बदल करणारी परिस्थिती ही
माणसाला खूप काही शिकवून जाते.
शेवटी उरतात त्या  फक्त आठवणीचं,

आठवणींचं एक अतूट नातं असत माणसांशी,
काळ बदलला, माणसे बदलली,
तरीही घट्ट धरून राहतात त्या आठवणीच,
हसऱ्या, बोलक्या, रडक्या असतात त्या आठवणीच,

आठवणींचं काय हो, क्षणात आपल्या
तर क्षणात परक्या होऊन जातात
पण माणसाच्या जीवावर घाव
करून जातात....

माणसांचं काय हो, नेहमी येतात
अन जातात पण उरतात शेवटी
आठवणीच ना...

म्हणून बुवा मी सांगते नेहमी
हसत जगा व हसऱ्या आठवणी जपत जगा..  


- दरशना  धामदार 

No comments:

Post a Comment