Tuesday, 13 December 2016

त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, सांगा तुमचं काय गेलं..?

त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, सांगा तुमचं काय गेलं..?
💗💗 त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, सांगा तुमचं काय गेलं..? 💗💗 – असं रोकडा सवाल करणारी कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिली, तेव्हाची तरुण पिढी आणि आजचं तारुण्य यांच्या जगण्यात खरं तर किती तफावत आहे…
Valentine Week सुरु झाला म्हणून सहजंच सुचलं… जगभरात ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा आठवडा Romantic Week म्हणून साजरा होतो आणि फेब्रुवारीचा दुसरा रविवार "जागतिक लग्न दिवस" म्हणून साजरा केल्या जातो. (सहजंच General Knowledge म्हणून सांगितलं…) जगभरात प्रेमाचं Celebration होतं… पण हा मुद्दा काढण्यामागे महत्वाचा हेतू असा, आपल्या समाजात आहे तरुणांना प्रेमात पडण्याचं स्वतंत्र..? प्रेम करण्याचा अधिकार…? मला हेच कळत नाही, प्रेम करणं पाप आहे का..?
जाती व्यवस्थेची दरी कमी करण्यासाठी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न व्हावीत म्हणून शासनाकडून पुरस्कार आणि विवध योजना राबबिल्या जातात. मात्र जातीपातीचे दबाव ग्रामीण भागात आजही इतके जास्त आहेत कि, पर्जातीयच कशाला स्वजातीच्या मुलाच्या/मुलीच्या प्रेमात पडण्याइतपत स्वतंत्र अजूनही ग्रामीण भागातल्या मुला-मुलींना नाही. मी ग्रामीण भागातून आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी मी एकदम जवळून बघितल्या आहे.
माझा अनुभव सांगायचा झाल्यास, BCA च्या पहिल्या वर्षालाच असताना, जवळच्या गावातून सावनेरमध्ये शिकायला येणाऱ्या एका मैत्रिणीचं (किरण नाव होतं कदाचित तिचं, बरोबर नाही माहित) शिक्षण अचानक थांबविण्यात आलं. कारण एका मुलाशी नाव जोडून कुणीतरी ते गावापासून शहरात येणाऱ्या रस्त्यावर, आजूबाजूला दगडावर लिहून ठेवलं होतं. वर्गातल्या एका मुलासोबत नाव लिहून ठेवण्याची चर्चा गावभर झाली. तिच्या काकांनी तिच्या वडिलांना भरीस घालत तिचं शिक्षण बंद करण्यास भाग पाडलं. हे सगळं सुरु असताना दुसरीकडे असंही दिसतं कि, एरव्ही गावातली तरुण मुलं, एकमेकांना प्रेमप्रकरणांमध्ये जीवापाड मदत करतात. गावातच राहतो न... म्हणून या गोष्टींचा फारसा अनुभव आहे; प्रसंगी जीव धोक्यात घालून आपण कसा एका मित्राचा प्रेमविवाह लावून दिला हे इतरांना फुशारक्या मारत रंगवून सांगतात. पण गोष्ट जेव्हा त्याच्या सख्या वा अगदी चुलत बहिणीची किंवा जवळच्या नात्यातल्या मुलीची येते, तेव्हा लगेच ही तरुण मुलं त्यांच्याही नकळत "पुरुषी" पवित्रा घेत Possessive बनतात. आमच्या जातीतल्या, नात्यातल्या स्त्रियांनी कसं ते आम्ही ठरवू हा त्यांच्या पवित्रा असतो.
तुम्हालाही कधी न कधी, कुणा न कुणाशी प्रेम झालेच असेल,… या वयापर्यंत होतंच असं, स्वाभाविक आहे, आणि त्यात मीही अपवाद नाही… प्रेम करत असताना आपल्याला याची जाणीवच राहत नाही कि, समाज काय म्हणेल आणि नंतर जेव्हा "दो जिस्म एक जान" होण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला "दुनियाभऱ्याचे" विचार यायला लागता, नातेवाईक काय म्हणतील, लोकं काय म्हणतील, वडील परवानगी देणार नाही, तू समजून घे, आपण इथेच थांबूया…. आणखी देव जाने काय काय…. मग हे सगळं प्रेम करण्याआधी समजायला नको होतो..? त्या वेळी कुणी भाग पाडलं होतं का तुम्हाला प्रेम करायला…?
आणि या प्रश्नाचं उत्तर एकदम साधं आहे, प्रेम काही जाणूनबुजून करत नाही, ते फक्त होऊन जातं… नकळत.. प्रेमाचे बीज मनात उगवायला लागतात,.. भेटीच्या कळ्या फुलायला लागतात आणि… लवकरच…. प्रेमाचं फुल तिथे उमलतं. ( हाहाहा…. माझंही असंच काहीतरी झालंय). त्यावर कुणाचंही बंधन राहत नाही. प्रत्येक अधिकार आहे. प्रेम करण्याचा. पण या सगळ्यात प्रेम करणाऱ्या सगळ्यांचा एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे, तो म्हणजे.. आमच्या प्रेमाला नकार देणारे तुम्ही कोण…? प्रेमात पडणाऱ्यांना धडा शिकविणारे तुम्ही कोण..? प्रेमात पडण्याचा अधिकार आहे आम्हला, हे ओरडून का सांगावं लागतं…?
आज इतकंच, पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू… काही प्रश्नांची उत्तरं घेऊन आणि काही नवीन प्रश्न घेऊन… तो पर्यंत Keep Falling In Love. Have A Lovely Valentine Week. जाता जाता एक सल्ला देऊन जातो, "तुमच्याकडे ताकद आहे, अमाप प्रेम करण्याची, ती कुणीही हिरावू शकत नाही."

- शुभम न. दातारकर

(Originally Published on : NotesBox | 10 Feb 2015 | Due to Technical Reasons That Blog is Closed)

2 comments:

  1. Awesome written 👌👌😘😘

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनघा; तुम्हाला इथे बघून आनंद झाला :)

      Delete