बोलता बोलता म्हणला “कॉलेजमध्ये गेलास आणि विसरलास लेका मला, माझी तर आठवण करत नाहीस, पण तिची ? तिलाही विसरलास की काय ?”
दहावीत होतो मी, ती पण माझ्याच वर्गात. बाजूच्याच बेंचवर बसायची. साहजिकच आहे, सुंदर होती ती; खुप सुंदर; तिला बघून खरंच विश्वास बसावा, की देवाने तिला स्वतःच्या हातांनी बनवलं असेल, आणि मला इंटरनेट वरून डाऊनलोड केलं असेल.
उंच माथा, काळेभोर केस, घारे डोळे, सडपातळ बांधा आणि एका स्मित हास्यात मोहून टाकणारे तिचे ओठ... आणि अश्यासुंदर रुपाला नजर लागू नये म्हणून तो ओठांवरचा तीळ...
उफ्फ्फ...
असली भारी जोडीदार कुणाला नको असणार... मीपण त्याला अपवाद नाहीच...
उंच माथा, काळेभोर केस, घारे डोळे, सडपातळ बांधा आणि एका स्मित हास्यात मोहून टाकणारे तिचे ओठ... आणि अश्यासुंदर रुपाला नजर लागू नये म्हणून तो ओठांवरचा तीळ...
उफ्फ्फ...
असली भारी जोडीदार कुणाला नको असणार... मीपण त्याला अपवाद नाहीच...
१६ वर्षांचा पण झालो नव्हतो; आणि मिशीची कोरही आली नव्हती, तरी मनात “तिच्याशीच लग्न करायचं” रोपटं उगवलं होतं.
रोज बोलणं व्हायचं, एकत्र हसणं व्हायचं, गप्पा गोष्टींत दिवस निघून जायचा. बसायला तोच बेंच मिळावा म्हणून, उदयगिरीचा असूनही लवकर वर्गात यायचो, ती आपल्या सोबत हसतेय, म्हणून आणखी जोर-जोरात “मेंढी-मेंढी” ओरडायचो.बाकी मुलं होती वर्गात, पण काहीही असलं तरी तिलाच जाऊनच विचारायचो, मला तिच्याशी बोलायला वेळ मिळावा म्हणून सतत काही ना काही काम काढायचो. दिवसेंदिवस तिच्या जवळ जायला लागलो, तिला समजायला लागलो, तिचा विचार करायला लागलो, राई एवढ्या मनात आभाळाएवढं स्वप्न रंगवायला लागलो.
एकदा तिची डायरी वाचली होती, काय भारी चिडली होती ती तेव्हा. पण ती डायरी वाचल्यावर मात्र हे कळलं, ती दिसते; त्यापेक्षाही ती जास्त सुंदर आहे.
प्रवाहासोबत मी वाहत गेलो आणि कधी जीव जडला तिच्यावर कळलंच नाही.
त्या प्रेमात वासना
नव्हती, अपेक्षा नव्हत्या आणि दुसरीकडून तितकच प्रेम असण्याची काळजीही नव्हती.
बस्स प्रेम होतं... निर्मळ आणि बिनशर्त...
तिला याबद्दल बोललो नाही कधीच, कसं बोलायचं ते पण माहिती नव्हतं, आणि त्यापेक्षा भीती होती कानाखाली झापड खायची, मैत्री तुटायची आणि तिला नेहमीसाठी हरवण्याची..
बोललोही असतो तर कदाचित तिने गंभीरतेने घेतलं नसतं, आणि त्याचं कारण म्हणजे माझा पोरकट स्वभाव. मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या, दहावीनंतर ती शाळा सोडून बाहेर शिकायला गेली. मी तिथेच राहलो.
बोललोही असतो तर कदाचित तिने गंभीरतेने घेतलं नसतं, आणि त्याचं कारण म्हणजे माझा पोरकट स्वभाव. मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या, दहावीनंतर ती शाळा सोडून बाहेर शिकायला गेली. मी तिथेच राहलो.
तिच्या आठवणीत... कायमचा.
सहा वर्ष लोटली त्या
गोष्टीला, आता तर आमची मैत्रीपण
तितकी खास राहली नाही, नेहमी भेटत नाही, वेळ काढून बोलत नाही, आधीसारखं आता काहीच
नाही. पण तो बेंच मात्र तसाच
आहे, त्या आठवणीही तश्याच आहेत, आणि ते पाहिलं प्रेम... तेही तसंच आहे...
कारण प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...
- शुभम न. दातारकर
क्या बात शुभम... 👌👌👌👌😍
ReplyDeleteThnx Angha 😃
Delete😍😍 A future writer in making.
ReplyDeleteशब्दनंशब्द सुंदर लिहिलेले आहेत!!👍👌
ReplyDeleteWow👏👏
ReplyDelete👌 mast..
ReplyDelete